उपोषण म्हणजे नक्की काय याचा विचार करायला मला एकीने भाग पाडले. मग त्याबाबतचे अनेक विचार मनात घोंगावू लागले. नक्की हि भानगड आहे तरी काय? आपण अनेक ठिकाणी आमरण उपोषण असे फलक बघतो. तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न नेहमीच पडत असावा . कि प्रकार आहे तरी काय? एखाद्याच्या विरोधात आपण जायचे आणि उपोषण करायचे , मग त्या माणसाला त्याचा काय फरक पडणार? उपाशी आपण राहायचे मग त्याला त्रास कसा होणार....लहान पणी तर या गोष्टीचा मला तिटकारा वाटायचा, अरे इंग्रजांच्या विरोधात या तत्वाचा वापर करून गांधी जिनी भारताला स्वातंत्र करायचा प्रयत्न केला...पण असे काय गोष्ट आहे ज्यामुळे या उपोषणाला इतकी प्रसिद्धी मिळते....खूप दिवस त्यामागची कारणे मला कळूच शकली नाही......
कोणत्याही क्रांतीची सुरुवात हि हिंसेने च होते असे माझे प्रांजळ मत होते...एखादा आपले ऐकत नाही आहे मग त्याच्या मुस्कटात मारली पाहिजे अश्या किंचित विचारांचा मी होतो. कुठे तरी काही करताना नुकसान तर होणारच पण ते भोगले पाहिजे असे माझे विचार होते..एखाद्याचे विचार खोलवर मनात ठसावे असे मला देखील नेहमी वाटायचे ..गांधी जी मला तेव्हा मला क्रांतीचे शत्रू वाटायचे ....पण जेव्हा मी त्यांच्या नीतीचा जास्तीत जास्त विचार केला...तेव्हा मला त्यांच्या विचारांमधील खोलवर रुजलेली भावना कळली. मानवाच्या स्थायी भावाचा त्यांनी पुरेपूर विचार केला होता. आपल्या पेक्षा ताकदवर साम्राज्या पुढे किती काळ निभाव लागला असता ? याचा त्यांनी खूप अभ्यास केलेला दिसला. उपोषण हे अस्त्र नसून ते एक शास्त्र आहे हे खरेच आहे... गांधी जी नि स्वतः उपोषण केली....त्यामुळे इंग्रज सत्तेचे काही नुकसान नव्हते पण आपल्या साठी कोणी तरी आपले प्राण गमवायला तयार आहे हि भावना संपूर्ण भारत भर पसरली ......त्यामुळे संपूर्ण भारतात देशप्रेमाची एक लाट निर्माण झाली. एखाद्या गोष्टीत असहकार करणे हे देखील आंदोलनाचे भाग आहे. गांधी जी स्वतः उपाशी राहिले कि इंग्रज अधिकाऱ्यांच्या मनात देखील संभ्रम निर्माण व्हायचा...कि आपल्या चुकीच्या वागण्यामुळे कोणी तरी उपाशी आहे.. हि अपराधी पणाची भावना हि त्यांना खिजवत रहायची मनात. कुठे तरी त्यांच्या हि मनात स्वतः बद्दल घृणा निर्माण व्हायची. मग उपोषणात ते एकाच वेळी किती तरी करून जायचे हे कळायला मला अण्णा हझारेंचे आंदोलन झाल्यावर कळले. सशत्र लढा हा एक क्रांतीचा भाग असू शकतो. फ्रेंच अमेरिकन राज्यक्रांती त्यानुसार झाली असेल पण भारताची क्रांती हि खरेच नाविन्यपूर्ण आहे ...क्रांती कोणतीही असो..त्यामध्ये शिरताना स्वताचे मृत्युपत्र जवळ ठेवून च निघायला हवे. जो माणूस मृत्यूला घाबरला तो क्रांतीची भाषा करू शकत नाही. क्रांती चे अनेक प्रकार पाहिले असतील सर्वांनी ....पण भारतीय राज्यक्रांती हि खरेच वेगळी आहे जगापेक्षा...इंग्रझांशी प्रत्यक्ष जमिनीवर लढणे खरेच सोपे नव्हते. या आधी त्यांनी खूप प्रयत्न केले देखील, पण त्यांचे अद्यावत शस्त्राते , विकसित युद्धनीती या पुढे हे अशक्य होते.....अशावेळी त्यांच्याशी लाध्ण्याकरिता काही तरी नवीन कल्पना काढणे खूप गरजेचे होते. अशावेळी अहिंसा हा मार्ग अवलंबला गेला. सुरुवातीला इंग्रजांना हे नवल च वाटले खरे. त्यांनी ते खूप ढिसाळ पणे घेतले.......हळू हळू त्या गोष्टीचे लोन संपूर्ण भारतात पसरले गेले. एक अशी वेळ येऊन गेली कि संपूर्ण भारत पेटला गेला त्या अहिंसक आंदोलना मूळे . ..मुळात एकदम सहज सोपा वाटणारा मार्ग खूप पुढे गेला होता. इंग्रजांच्या लक्षात च नाही आले कि संपूर्ण भारत कधी क्रांतीच्या ज्वालांनी पेटला. ती चूक त्यांना १९४२ च्या आंदोलनात जाणवली, एका बाजूला असहकार आणि दुसऱ्या बाजूला सुभास चंद्र बोस यांची विकसित सैन्य. इंग्रज पुरेसे हतबल झाले. अशा वेळी इंग्रजांनी या भारतातून काढता पाय घेतला.
स्वातंत्र नंतर या गोष्टीचा भारतीयांना च विसर पडला. उपोषण हे जाहिरात बाजीचे साधन झाले.फुकट प्रसिद्धी हवी असेल तर उपोषण करा असे भारतीयांना वाटू लागले.त्याच्या मागची सामार्थ्याशी त्यांना विसर पडली. काही वेळा काही चांगले प्रयत्न झाले पण उपोषण बद्दल सरकार हि उदासीन झाली. कोण उपोषण करते आहे याच्या कडे त्यांचा जाणीवपूर्वक कानाडोळा होऊ लागला....ज्याचे मन जिवंत आहे त्याच्या समोर हा उपोषणाचा मार्ग यशस्वी . नाही तर ज्याला दुसर्याच्या सुख दुखाची कदर च नाही त्याला काय कळणार उपोषण म्हणजे काय? पण तो व्यक्ती एक विसरतो. अहिंसक आंदोलनाला कधी हि हिंसक वळण लागू शकते....आणि ते इतके भयंकर असेल कि..त्याच्यातून सुटणे अशक्य आहे..जी गोष्ट इंग्रजांना कळली ती गोष्ट आताच्या राजकारणी लोकांना कळत नाही. खरे म्हणजे याचे मला जास्त दुखः वाटते..जेव्हा रक्त रंजीत क्रांती होते तेव्हा खूप काही गमवावे लागते. पण शेवटी विस्पोटा शिवाय पर्याय देखील शिल्लक नसतो.
Thursday, December 29, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment